Thursday 29 August 2013

ना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध



यापुढे ना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध असेल.
सदर जीआर १७ आगष्ट २०१३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी काढला असून तो सरकारच्या वेब साईटवर
शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत
https://www.maharashtra.gov.in/1...  येथे उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक  201308191531017222 आहे.

Tuesday 27 August 2013

Can democracy survive without debate and discussion?

http://epaper.dnaindia.com/story.aspx?edorsup=Sup&ed_code=820040&ed_page=4&boxid=30129&id=50942&ed_date=08/27/2013
Can democracy survive without debate and discussion?
With our country marred by various scams, rape incidents, terrorist attacks and other issues, our political leaders from the ruling as well as opposition parties often indulge in blame-game or
maintain silence to score political points, unwilling to discuss or debate on any issue. Is there a need to revive the dying culture of debate and discussion among our leaders?
Speak Up
We do not tolerate a viewpoint which is not convenient for us
It is tragic but true that we seem to have lost out completely on the culture of debate and discussion that built the basic foundation of our democracy. Now we do not tolerate a view that doesn't suit us, not because of any ideological differences but just because the other view is not convenient for us.
That is the reason that we have anti-debate brigades ranging from religious brigades, casteist brigades, regional brigades to moral policing brigades. They have two things in common, intolerance for the "other" viewpoint and abhorrence to an open discussion. The only hope for us is the youth, who are still not completely ruined by the cynicism of the elders, but we need to act fast before the current education system ruins them.
-Achyut Vaze, educationist and Marathi playwright

There is no fast solution to revive the debate and
discussion culture
Even though we may say tha t our culture of debate and discussion is dying, however, I hope that this phase will be over and we can once again revive it. Our political leaders do not indulge in healthy debate and discussion because politics today is nothing but business for profits and ostentatious display of money power.
Not only politicians but even people in their day-to-day life don't have time to wait and think rationally about an issue, everyone want to live their own life and posses as much as they can. The politicians will have to earn quickly when they get a chance, otherwise they will have to wait for another 5 years, which is big time. I don't feel that there is any fast solution to revive the debate and discussion culture. Politicians will make unnecessary issues out of anything to gain political points.
-Rajan Khan, Marathi writer

We are trying to mimic
the western dialogueless society
Gopal Ganesh Agarkar in 1880 had said that one should not fear debate, di scussion or dialogue. Mahatma Phule, Mahadev Govind Ranade and other such social reformers played a big role in maintaining our heritage of debate. The beauty of democracy is in its tool of debate and if we lose that then we are left with nothing.
Since 1952, when the general elections era started in our country, voters became very important for the political leaders. To attract voter, they started dividing the vote banks on the basis of caste, religion, states, languages and so on. Our country has a history of debate, which goes back to the time of Ashoka, Chanakya, Gautam Buddha. I agree that the culture of debate is dying and there is a need for revival and with each passing day our politicians are becoming more and more narrow minded. After globalisation, though mobile and social media increased connectivity but the urge to maintain dialogues has shortened. Today we are made to talk in short. We are mimicking the western dialogueless society and losing on our debate and discussion culture.
-Hari Narke, head & professor,
Mahatma Phule Chait, UoP

Country can benefit from wise counsel of millions of wise thinkers
The debate culture is fast dying, which means that country's fate is doomed in the hands of deaf and dumb politicos. The country can benefit from wise counsel of millions of wise thinkers, only if they can reach out to our leaders.
The government is falling short and not rising to challenges by listening to these highly qualified people, wherein the country is losing out. Things can revive only by opening platform for debate, discussion and dialogue. We can find solution to all the problems in our society. I don't understand why the authorities are not allowing and engaging these brilliant people, who have solutions and wise counsel.

-RV Krishnan, head, Business Development Bureau
We must imbibe these
qualities and values in
education process
We are losing our culture of debate and d iscussion because we are losing tolerance. People have lost the capacity to accept someone else's views. They insist that what I say is right and what others say is wrong. The feeling of compassion is must nowadays, to appreciate and accept what others say. We must imbibe these qualities in education process. For example if one takes engineering or management, there is no subject of liberal arts like humanities, social science, poetry, etc, taught to the students. I would say liberal arts liberates one's mind, by which the mind is open to all other views. The decision by discussion, debate or dialogue will happen only if the quality is imbibed to the younger generation through their education process.
-SB Mujumdar, Founder and President, Symbiosis Society

अकस्मात विझलेला झंझावात...Arun Khore


By  on August 25, 2013
0


feature size
एखादा चिकाटीचा विचारी कार्यकर्ता आणि विलक्षण जिद्दीचा माणूस अचानक निघून गेला तर काय वाटेल? धक्का तर बसेलच, पण त्यापेक्षाही अधिक होतं ते दुःख. मंगळवारची सकाळ आम्हा सर्वांना असा भीषण धक्का घेऊन आली. नरेंद्र हा आमचा चळवळीतला म्होरक्या माथेफिरूच्या गोळ्यांना बळी पडला. महाराष्ट्रातील पुरोगामी विचार परंपरेला बळ देणारा हा उमदा नेता अकस्मात झंझावात विझल्यासारखा निघून गेला, ती हानी कशानेच भरून येणार नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची आणि जागृतीची परंपरा खूप दीर्घ आणि मोठी आहे. त्यामुळेच या वाटेतले धोकेही तितकेच मोठे. एकोणिसाव्या शतकात याच प्रस्थापितांनी काही मारेकरी महात्मा फुले यांना मारण्यासाठी पाठवले होते, त्या मारेकर्यांचं सुदैव असं की त्यांना फुल्यांचं महात्मापण कळालं आणि म्हणून त्यांनी आपल्या हातातल्या कुर्हाडी खाली ठेवल्या. फुले जे काम ज्या वर्गासाठी करत होते, त्यासाठी हे मारेकरी काम करायला तयार झाले, हा इतिहास आहे.
नरेंद्रची हत्या एकविसाव्या शतकात झाली आहे. जेव्हा समाज आणि सरकार सकारात्मक होत आहे, प्रगत होत आहे, त्या काळात अशी हत्या का होते, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रातील आणि देशातील तरुण वर्गाचे असे आयकॉन होते की, त्यांच्या कामात सहभागी होण्याचा विचार आणि निर्धार असे हजारो तरुण करत होते. चळवळीमधले सर्वजण त्याला नरेंद्र याच नावाने संबोधायचे. काही जण आपुलकीने नरुभाऊ असाही उल्लेख करायचे. गांधीजी, सानेगुरुजी, एसेम, नानासाहेब, मृणाल गोरे, मधू दंडवते या सगळ्यांच्या संस्कारात वाढलेले दाभोलकर विलक्षण साधे आणि सच्चे होते. साधे कपडे, पायात साध्या चपला आणि खांद्यावर शबनमची पिशवी याच रूपात नरेंद्रला आम्ही गेली तीस वर्षं बघत आलो आहोत. मंगळवारी पुणे शहरातल्या ओंकारेश्वराजवळच्या ज्या पुलावर त्याला गोळ्या मारल्या, तिथे त्याची पडलेली साधी चप्पल वाहिन्यांच्या बातम्यातून बघितल्यावर आम्हा सर्वांनाच चुकल्यासारखं झालं.
अंधश्रद्धांना विरोध करणारी आणि त्यासाठी तरुणांची एक क्रियाशील फळी उभी करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही संघटना नरेंद्रने स्थापन केली. बुवाबाजी, जादूटोणा, जारण-मारणासारख्या काही अघोरी उपायांच्या विरोधात एक हल्लाबोल मोहीम त्याने सुरू केली. राष्ट्रीय पातळीवर तामिळनाडूतील डॉ. अब्राहम कोवूर यांनी हा हल्ला सुरू केला होता. मात्र त्याला तरुणांची शक्ती लाभली, ती अंनिसच्या माध्यमातून. नरेंद्रची भाषणं आणि नंतर लागोपाठ प्रसिद्ध होत जाणारी त्याची पुस्तकं यामुळे महाराष्ट्रातील खेडोपाडी अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि या सगळ्या अंधश्रद्धांचा मुकाबला करायला एकत्र येऊ लागले. पुण्यात १९९२ साली झालेल्या अंनिसच्या राष्ट्रीय परिषदेत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. व्ही. एम. तारकुंडे, नानासाहेब गोरे, ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, सकाळचे कार्यकारी संचालक प्रतापराव पवार या मान्यवरांनी विचारमंथन केलं. महाराष्ट्रातून आलेले दीड-दोन हजार तरुण कार्यकर्ते तीन दिवस या विचारमंथनात रमले होते.
नरबळी का जातात? देवीचा कोप म्हणून जटांसारखे केस वाढवायचे का? अंगात का येतं? हातातून अंगठी कशी काढली जाते? मध्यरात्री भुतं कुठून येतात? स्मशानात भुतं असतात का? असे शेकडो प्रश्न डॉ. दाभोलकरांनी आपल्या चळवळीत उपस्थित केले आणि त्यांची खरी उत्तरं समाजासमोर शास्त्रीय निष्कर्षानुसार दिली. हातचलाखीने अंगठी किंवा भस्म हे मोठे मुनी किंवा स्वामी कसे काढतात याची प्रात्यक्षिकं तर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी दाखवायला सुरुवात केली. वणव्यावरून चालत जाणं किंवा हातात एखादा पेटता गोळा घेऊन हातचलाखी करणं या सगळ्यांची शास्त्रीय तपासणी त्यांनी केली.यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि लोकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं दिली. ‘लढे अंधश्रद्धेचे’, ‘बुवाबाजीविरुद्धची लढाई’ अशी अनेक पुस्तकं तरुणांसमोर आली आणि चळवळीचं वातावरण बदलून गेलं.
बारामती तालुक्यातल्या एका नरबळी प्रकरणात अंनिसने कार्यकर्त्यांची टीम पाठवली आणि सत्यशोधन केलं. अंनिसचे कार्यकर्ते एकदा मध्यरात्री स्मशानभूमीत गेले आणि भुतखेते नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. ज्योतिष शास्त्राबाबतही त्यांनी आक्षेप घेतले आणि त्यामुळे भल्याभल्या दुकानदार ज्योतिषांची भंबेरी उडाली. याबाबत तर अंनिसने पाच लाखाचं बक्षिस जाहीर केलं होतं. तथापि कोणीही ज्योतिषी त्याला प्रतिवाद करण्यासाठी पुढे आला नाही. अनेक देवदासींच्या आणि त्यांच्या मुलींच्या जटा कापण्याचे कार्यक्रम अंनिसने घेतले. समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असताना अजूनही प्रचलित असलेल्या भीषण अंधश्रद्धा आणि त्यामुळे प्राणावर बेतणारी जोखीम लक्षात घेऊन नव्या कायद्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार अंधश्रद्धाविरोधी अर्थातच जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याचं ठरवलं होतं. तथापि पुरोगामी महाराष्ट्राच्या सरकारला गेली १७ वर्षं हा कायदा करता आलेला नाही. यातली ३ वर्षं युती सरकारची आहेत आणि उरलेली १४ वर्षं आघाडी सरकारची आहेत.
महाराष्ट्रातल्या सामाजिक बदलाच्या सगळ्या चळवळीत नरेंद्र अग्रभागी होता. त्यानेच अनेक नामवंत कलावंतांना या वाटेवर आणलं. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रिमा लागू, सुहास जोशी असे अनेक ज्येष्ठ कलावंत नरेंद्रच्या शब्दाखातर राज्यभराच्या दौर्याला निघाले. एक लढाऊ सेनानी ज्याप्रमाणे आपली आणखी करतो, त्याप्रमाणे अंधश्रद्धेच्या विरोधातील सगळ्या मंडळींना त्याने आपले मुद्दे आणि उद्दिष्ट्यं यांची एक निखळ अशी मांडणी करून त्यात सहभागी केलं होतं. आज महाराष्ट्रातील या चळवळीला त्याच्या जाण्याने एक पोरकेपण आलं आहे. मात्र पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक कायद्यात कसं बदलेल, यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे…
- अरुण खोरे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली..Dr Pradeep Patkar



माझा आणि येथील कित्येक जेष्ठ कार्यकर्त्यांचा डॉ. दाभोलकरांशी १९८८ ते २०१३ या काळातला २५ वर्षांचा स्नेहबंध होता. डॉ. दाभोलकर हे आमच्यासाठी समाज कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण होते. प्रचंड उरक, अमाप उत्साह, अपार कष्ट, प्रयत्नवादाचे मूर्तिमंत उदाहरण, सत्शील वर्तन, निष्कलंक चारित्र्य, समाजाची उत्तम जाण, समाजातील पीडितांच्या दुक्खाबाबत कणव, जाणीव, सहवेदना, आयुष्य वाहून टाकणारा निरलस कार्यकर्ता व नेता. विशेषणे अपुरी ठरावित असे जीवन चरित्र.
असे कार्यकर्ते, नेते, महाराष्ट्रात आधीच बोटावर मोजण्या इतपत. ज्या काळात अश्या माणसांची आत्यंतिक गरज त्याच काळात त्यांची निर्घृण हत्या. पुरोगामी महाराष्ट्राचा अणखी एक विचारस्तंभ आता आपल्यापाशी नाही. २०० शाखा आणि तालुका तिथे अनिस हे चित्र महाराष्ट्रात उभे करणारे हे नेतृत्व ! चळवळीपासुन नवा तरुण दूर रहात असल्याचे चित्र इतरत्र, अनिस मध्ये मात्र गेली २० वर्षे सतत तरुण कार्यकर्ते!! कार्यकर्तेहि असे जे पदराला खार लावून घरादारातली टीका सहन करून नोकरी रोजगार सांभाळीत समाजाचे गैरसमज दूर करीत , रोष पत्करीत, विवेकनिष्ठा जोपासत, रुजवीत, कामे करण्यास वेळोवेळी जीव धोक्यात घालून शोषक, गुंड, फसव्या सामाजकंटकांचा पर्दाफाश करीत भोळ्या अंधश्रद्ध भक्तांचे शोषण थांबवण्यासाठी जागोजाग धावणारा. विवेकवाहिनी, विवेकजागर, युवाएल्गार, शोध भुताचा बोध मनाचा, जातीअंताचा लढा, अश्या विविध उपक्रमाद्वारे शिक्षक-विद्यार्थी-महिला-कर्मचारी अशा समाज घटकात विवेक निर्भयता नीती रुजवीत २० वर्षे अविशांत श्रम करणारे असंख्य निरिच्छ सत्शील संयमी कार्यकर्ते आज महाराष्ट्रभर आहेत. ही तरुणाई डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली निरलस काम करीत आली, आणि करीत राहील.
शरीर संपले कि विचार संपतील असे वाटून खून करणारे ना धार्मिक ना नास्तिक. कारण आत्मा अमर आहे हा धार्मिकांचा सिद्धांत ! शरीर नाशवंत, विचार तेवढे अ-क्षर नाश न पावणारे - हे मानणारे विज्ञानवादी असे खून करणार नाहीत. ज्यांना समाजातील शोषणाची दखल घेण्यात जराही रस नाही जे सदा स्वार्थ साधण्यात मग्न. बरेचसे विचारवंत परदोषदर्शनात व्यग्र वा थोडे अध्यात्मात थोडे विज्ञानात, वेळ येताच कुंपणावर उडी मारून स्थिर! हा खून करतात मतीभ्रष्ट धर्मभ्रष्ट पाशवी वृत्तीचे गुन्हेगार ज्यांना ना कळला माणूस ना देव ना संस्कृती ना धर्म ना अध्यात्म!
निशस्त्र, संयमी, नेमस्तवादी वयवर्षे ६८ माणसाला,तो सकाळी फिरत असताना, निर्घृण अमानुषतेने मागून गोळ्या घालणे यात काडीचेही शौर्य दिसत नाही. हा ईश्वराचा न्याय म्हणणाऱ्याना ईश्वर हा इतका कुटील खूनाचा प्लॅन करेल तरी कसा असा प्रश्न पडत नाही. धर्म व ईश्वराविषयीचे गैरसमज, त्याच्या नावाखाली चाललेली शोषक कर्मकांडे, बळी विधी, अघोरी कृत्ये, बळींचा शारीरिक मानसिक छळ, लैंगिक शोषण, हत्या हे सारे थांबविण्यासाठी काम करणारा ईश्वराला प्रिय असेल यात शंका नाही. मग इश्वर या कर्माचे फळ असे कसे देइल अशी जराही शंका या विद्वान साधकाना कशी येत नाही !!
कि संस्कृती संभ्रमाच्या या काळात अनिस विरोधकांनी आपापले मेंदु जराही न वापरण्याचे ठरविले आहे काय ? ज्या विधेयकातील सर्व ११ कलमे कुठेही धर्म - हिंदुधर्म वा इतर कुठलाही- या विषयी बोलत नाहीत. त्यात आहे फक्त फसवणूक,दुखापत, दहशत , अयोग्य मार्गदर्शन/सक्ती, अविवेकी कृत्यांना प्रोत्साहन, मानवी हक्कांची पायमल्ली या व अश्या अनेक मानवी क्रूर कृत्यांचा विरोध ! माणसाचे भावनिक, शारीरिक, लैंगिक शोषण होऊ नये या साठी कायद्याचे संरक्षण त्या व्यक्तीस मिळावे व अशी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना सजा मिळावी एवढेच साधणारे हे विधेयक असताना त्या बाबत इतका खोटा प्रचार कशाशाठी ? तो हि विधेयक न वाचता, न समजून घेता ! ना इथे पूजेला, प्रार्थनेला,वारीला,यात्रेला, मिरवणुकीला, उत्सवाला, जपजाप्याला, मंत्राला विरोध. हे सारे करून माणसाना तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर त्यानाही प्रयत्नानीच आपापले प्रश्न / अडचणी सोडवाव्या लागतात. देवालये वा ट्रस्ट यांना कसलाही विरोध नाही. आहे तो फक्त देवाधर्माच्या नावाखाली दुःखीतांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, लैंगिक फसवणूक, इजा वा छळ आणि शोषण करण्याला विरोध!
हे विधेयक नसेल तर महाराष्ट्रात जागोजागी अशी दुष्कृत्ये, नरबळी, लैंगिक शोषण, अघोरी प्रथा फसवणूक, आणि अशास्त्रीय घातक उपचार (?) आज प्रमाणेच पुढेही चालू राहतील व कार्यकर्त्यांना व पोलिसांना कायद्याची विशेष मदत होऊ शकणार नाही. आपल्याला समाजात काय हवे आहे ? हे नीट लक्ष्यात घ्या आणि मग हा वटहुकुम - विधेयक – कायदा चांगला कि वाइट हे ठरवा.
आज डॉक्टरांच्या समाजकार्याचा वारसा जागोजागी समर्थपणे पेलू शकणारे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत. समाजाला सोबत घेउन प्रबोधन व संघर्ष दोन्हीचे संतुलन साधीत हे कार्य पुढे चालू राहील. अतिशय समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे. चार्वाक वादी लोकायत, बुद्धाचा प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत , त्याला जोडून मार्क्सवाद, प्रयोगशीलतेला चिकित्सेला पोषक असे चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, नागार्जुन, वाग्गभट, जैन गणित शास्त्रज्ञ - महावीराचार्य यांचे विचार, सांख्याचा प्रकृती विचार, कणादांचा परमाणु वाद , महाराष्ट्राची संतमहात्म्याची परंपरा, महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे विवेकी समाज निर्मितिचे महान कार्य, साने गुरुजींचा मानवता धर्म, स्वा सावरकर, प्रबोधनकार यांचे प्रखर वैज्ञानिक विचार आपल्यापाशी आहेत. अन्याय शोषण अत्याचार यांचा समर्थ प्रतिकार करण्याची ताकत तर सारी येथेच समाजातच उपलब्ध आहे.
आम्ही सावरू आणि घातक शोषणाला आवरूही, हे निश्चीत समजा.
आपणा सर्वाना बरोबर घेउन आम्ही सारे कार्यकर्ते पुढची वाटचाल करीत राहू. आपली साथ सोबत, वेळोवेळी मार्गदर्शन अपेक्षित आहे.
आमच्या या दुःखद प्रसंगात आमचे सांत्वन करायला आपण सोबत आहात या बद्दल आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्व कार्यकर्ते आपले कृतज्ञ आहोत.

डॉ. प्रदीप प. पाटकर
उपाध्यक्ष म. अनिस
p3patkars@sify.com

Monday 26 August 2013

India, Sexual Harassment and Mental Illness

http://ireport.cnn.com/docs/DOC-1025964

India, Sexual Harassment and Mental Illness

India, Sexual Harassment and Mental Illness
 
The CNN iReport about the American woman RoseChasm who was sexually harassed in India has become, as Lakshmi Chaudhry puts it, a “Rorschach test of sorts” for the world. I’ve never been one to back down from a good old Rorschach, so here’s my take. 

RoseChasm went back home and has since been diagnosed with a personality disorder and PTSD. Instead of politically, I’d like to think of this in terms of mental illness. Mental illness needs to be respected more for what it teaches us about our world. As many have pointed out, there are Indian women who go through this all the time. There was also RoseChasm’s fellow traveller TwoSeat who wrote about her experiences on the same trip. Since RoseChasm is white and TwoSeat is black, it seems that was the primary reason for TwoSeat’s different view. But I’m a fan of multiple primaries, and I suggest that the other difference between RoseChasm and TwoSeat is that they’re two different individuals. 

RoseChasm came here to work on her “Indian civilizations program”, which I find orientalizing (wow, spellcheck just made that a capital O, now I’ve seen everything) and objectifying. Then she writes this piece about “India”, a single entity I don’t believe in on the best of days. How bizarre would it be if an Indian woman came back from the US with an eating disorder and wrote a piece titled “USA: The Story You Never Wanted to Hear”? RoseChasm was objectified, and the effect of her writing is to objectify back. So I’m not happy with her interpretation of events. There’s a certain kind of humility required not to return that objectifying gaze, very hard to acquire if you think in terms of parity. 

I know a lot of Indian women who have seen all that RoseChasm describes and worse. They’ve been intimidated, have had their worldviews changed by the sheer volume of “eve-teasing” (the word itself tells you something about how it’s downplayed), and have possibly dressed differently at various stages of their lives to accommodate it (I know I have). Some have decided to pick their battles: They forget the staring, and fight the rest. Some, like the NGO Blank Noise, don’t back down from anything, and have been criticized for their classist view of upper-middle class women vs. lower-middle class men, and the stares that spring from that relationship. 

Many women still leave their homes without hesitation, go to their jobs, meet their friends and through experience develop instincts about how to respond, if at all, to this auto driver or that man in the bus. (Some will run away at the first sign of resistance, some will be turned on by it. This is a fact all these women know.) They also live with a risk, and try to make it as calculated as possible. Because the alternative is to live in fear. 

But many do not. Many women drop out of schools, colleges and jobs because the commute is too fraught, or even because there’s a particular gang that lies in wait for them on the road to school. Those who can afford it, get a car and stay in it unless they’re at home, in office, or some other safe place. This, as Lakshmi Chaudhry points out, is a prison too. 

All this is still an external view of the effects of “eve-teasing”. In the privacy of her self, though, each woman has a different amount and proportion of rage and fear. Each one is afraid of different things. As RoseChasm puts it: 

There was no way to prepare for the eyes, the eyes that every day stared with such entitlement at my body, with no change of expression whether I met their gaze or not. Walking to the fruit seller's or the tailor's I got stares so sharp that they sliced away bits of me piece by piece. 

In this I happen to personally concur. I’ve been groped, grabbed, flashed, stalked, “footsied”, whistled at, cornered, had my clothes pulled at, listened to a lot of words. The usual, and not too bad compared to some women. But the part that I’ve internalized more than most is the staring. For some reason I seem to be more afraid of that than the rest when I’m putting on my shoes and leaving the house. 

This is where mental illness comes in. Many women are stared at and made uneasy and uncomfortable. Only some of them feel that they, as people and not as women, are being “sliced away […] piece by piece”. 

I believe that everything RoseChasm says happened to her is true, and also that it was more than enough to traumatize her significantly. She just happened to internalize and to be extra vulnerable to the particular gaze that some men in these parts of the world directed at her (and not, for instance, to the internalized gazes that induce eating disorders). 

I’d like to emphasize this because I’m mentally ill, too, and I’ve been diagnosed with paranoid schizophrenia because the same gazes drove me crazy too, and made me relatively housebound. And I’m not white or black or foreign. I’ve experienced the same as the average Indian woman and it happens to have affected me in a different way. This, and the phenomenon around RoseChasm, is called the individuality of the human mind. 

But it doesn’t stop there. In fact, it only begins there. The top-heavy disclaimers in italics before RoseChasm’s report aren’t any different from a disclaimer one might have made about a “mad” person’s “rantings” 3,000 years ago. I say that paranoia, and mental illness in general, are one of several special, disregarded keys to understanding a culture. The individual mentally ill person suffers, and I never want to forget that. But this suffering offers us an insight into our way of doing things. Because the especially sensitive ones perceive a problem before most others do. 

There is a new, modern aspect to these stares, as RoseChasm points out: it’s the cell phones with cameras in every man’s hand. Men are constantly taking photos of white people and especially white women. Can I mention here with a pinch of salt that some people used to believe that a photograph could steal your soul? This sounds like the Margaret-Mead-in-Papua-New-Guinea school of anthropology, and of course I don’t like it much, but I’d love to exploit it for my metaphor, because it goes along with the “sliced away bits of me piece by piece”. Cut any good paranoid schizophrenic or “personality disorder” and they will bleed this. The cameras represent the gazes themselves, which can steal your sense of self (aka soul, if you like), if you’re sensitive in that way. There is nothing in the world that seems more natural to me (even when on antipsychotics!). I don’t want to call people with personality disorders or paranoia prophets, because they have a right to call themselves what they want, but privately I like to think of them as such. This is something that psychiatry will never understand, because it primarily (and possibly solely) wants to improve functionality. But man does not live by functionality alone. A few delusions of grandeur are necessary. 

What about solutions? There seems to be a yawning chasm between staring men and objectified women. Neither is human to the other. So humanizing helps. I try to do it as much as possible, engage auto drivers etc. in conversation, so that when I see a random lower-middle class man looking at me, I know there are others like him who aren't like him. Also, I'm beginning to stare back, finally. This is my way of humanizing myself for them. Some men drop their gazes, I like to think because they see the human looking out of my eyes. Some don’t. It's good to learn this in real time as opposed to imagining an a priori immutable stare and so never leaving the house. But there will always be someone wanting to play power games. That will never change. 

This is what I personally took away from RoseChasm’s essay. The world knows more about the stares now, and that’s good. I don’t know if we can do anything about it, but it would be beautiful if our great-granddaughters appeared human to men, and vice versa. 

महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज,..Hari Narke, Kalamnaama


By  on August 25, 2013
0
feature size
नरुभाऊंचा स्वभाव अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणं केवळ अशक्य. त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती. आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपलं म्हणणं अत्यंत विनयपूर्वक, युक्तिवादाच्या आधारे मांडत असत. त्यांच्यासारख्या ऋजू स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारं, सुन्न करणारं आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असं वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. श्याम मानव यांच्यासोबत काही वर्षं काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं. गेली १८ वर्षं राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावं म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रुंनी ही हत्या केली असावी असं वाटतं. गेली अनेक वर्षं ते ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवं कसदार रूप प्राप्त करून दिलं. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. ते या चळवळीचे जणू प्रतीकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत. नरुभाऊ हे मुळात सातार्यातील एक नामवंत डॉक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्यात आणून सामाजिक कामात उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. समतावादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणं त्यांना शक्य झालं नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो. १९८२ साली नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षं काम केलं. मी साधनेत अधूनमधून लिहित असे. ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याला प्रचंड विरोध झाला. स्वतः नरुभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असं नरुभाऊंनी सुचवलं. अवघ्या दोन दिवसांत हे करायचं होतं. त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नि नाही दिली काय, काय फरक पडतो? असं त्यांचं मत होतं. आज दाभोलकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकित झाले असते. साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. नरुभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केलं. तो साधना उत्तम चालवत आहे.
नरुभाऊ तत्त्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मीडियाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती. अनेक ख्यातनाम व्यक्तिंशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्हा सांभाळण्यात नरुभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असं मात्र त्यांनी कधीही केलं नाही. गेली २५ वर्षं चिकाटीने त्यांनी ‘अंनिस’चं काम लावून धरलं. अनेक बाबा, बुवांचे भांडाफोड केले. आम्ही मात्र त्यांना गंमतीने नरेंद्र महाराज दाभोलकर म्हणत असू. औरंगाबादला त्यांच्यावर आणि डॉ. श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डॉ. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरुभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशेबी. १४ वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावलं होतं. ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तिंना मतदान करा असं सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरुभाऊ आमचे सारथी होते. डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षं आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावलं याची निळूभाऊंना कुणकुण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचं त्यांचं गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावं या हेतुने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ जमा करायचं ठरलं. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी ‘लग्नाच्या बेडीचा’ दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भूमिका करत होते. दौर्यात या सर्वांची सोय करणं हे सोपं काम नव्हतं. नरुभाऊच ते काम करू जाणोत. नरुभाऊंनी हा ‘साकृनि’ आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरुभाऊंची मैत्री होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचे ते गेली काही वर्षं समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऐवजी दोन-तीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रित केलेली होती आणि ती कामं चिकाटीने लावून धरलेली होती. त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर (मुद्रा) अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची, प्रमिला कांबळेची निर्घृण हत्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केलं. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. नरुभाऊंचं टायमिंग फार अचूक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली. परवा लातूरलाही ‘जातीला मूठमाती द्या’ ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचं गठ्ठा मतदान मिळावं म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असं माझं मत होतं, आहे. नरुभाऊ म्हणाले, ‘हे करण्याएवढे आपण शक्तिशाली नाही. ते करायचं तर ‘पर्यायी राजकारण’ करावं लागणार. आजतरी तसं करणं मला परवडणारं नाही.’
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जातिद्वेष पसरवणार्या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून, जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडेकरांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. ते लेख मी साधनाकडे पाठवले. मात्र मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.
सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावलं होतं. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपं नाहीत, चोर्या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी ‘चला चोर्या करायला, चला शिंगणापुरला’ अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आलं. आम्ही चिडलो. ‘त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्या करणं नैतिक कसं?’ यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला. चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भूमिका न घेण्याचं आणि त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचं कौशल्य त्यांना साधलेलं होतं.
व्यक्तिची हत्या करून विचारांची हत्या होत नसते. उलट विचार अधिक मजबूत होतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


By  on August 25, 2013

माणूस मारून विचार नष्ट होत नाही..Arun Jawale, ..Kalamnaama


By  on August 25, 2013
0
feature size
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला पुन्हा एकदा काळिमा फासला गेला आहे. १९४८ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करून नथुराम गोडसे या पुण्यातल्या कर्मठ धर्मांध माथेफिरूने महाराष्ट्राला असाच कलंक लावला होता. या दोन्ही घटनांमधल्या ६०-६५ वर्षांच्या काळातही शरमेने मान खाली घालायला लावणार्या अनेक घटना घडलेल्या आहेत. विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याची ज्यांची हिंमत नाही आणि क्षमताही नाही असे विचारशून्य लोकच अशाप्रकारचे भ्याड मार्ग अवलंबत असतात! माणूस मारून विचार नष्ट होत नसतो! माणसं मारून सामाजिक परिवर्तन रोखू पाहणार्या या अमानवी आणि विकृत प्रवृत्तीचा निषेध करावा तितका थोडाच आहे.
भारतात गेल्या तीनचार हजार वर्षांपासून याच प्रकारची अमानुष मनोवृत्ती समतेचा, सहिष्णुतेचा, सर्वसमावेशकतेचा आणि विवेकाचा आग्रह धरणार्यांचा खून करत आलेली आहे, हा इतिहास यानिमित्ताने ताजा झालाय. आपली संस्कृती सहिष्णू आणि सर्वसमावेशक असल्याची फुशारकी रात्रंदिवस मारणारेच या असहिष्णू हत्याकांडात हिरिरीने सहभाग घेत असतात हे आता लपून राहिलेलं नाही. जरा वेगळा, चांगला, समाजाच्या भल्याचा विचार मांडणार्यांचे काय हाल आपल्या वैदिक-हिंदू धर्मसंस्कृतीने केले याची हवी तेवढी उदाहरणं देता येतील. चार्वाकाला जिवंत का जाळण्यात आलं, कौटिल्याचं अर्थशास्त्र शेकडो वर्षं गायब का होतं, सम्राट हर्षवर्धनाचा खून करण्याचा प्रयत्न वारंवार का करण्यात आला, बसवेश्वरावर हल्ले का झाले, चक्रधराला का मारलं, वारकरी परंपरेतील आद्य संत अणि प्रतिभावंत नेते असलेल्या नामदेवांना मंदिरात का येऊ दिलं नाही, संत तुकारामांनी असा कोणता गुन्हा केला होता ज्यामुळे त्यांची स्वर्गात सदेह रवानगी करण्यात आली? संत ज्ञानेश्वरांसारखा निरागस कोवळा मुलगा आपल्या प्रतिभेची चमक दाखवू लागताच वयाच्या केवळ अठराव्या वर्षी हे जग का सोडतो? समाधी घेण्यासाठी त्यांना कुणी आणि का भरीस घातलं? ज्ञानेश्वरांचे आईवडील आत्महत्या का करतात? चोखामेळा आयुष्यभर पायरीवर समाधान का मानत असे? जोतिराव फुल्यांवर मारेकरी का पाठवले गेले? सावित्रीबाईंवर शेण का टाकण्यात आलं? रघुनाथराव कर्व्यांवर शिव्याशापांचा भडिमार का केला? महात्मा गांधींचा खून कशासाठी केला गेला? असे बरेच प्रश्न विचारता येतात. या सगळ्या घटना कोणत्या सर्वसमावेशक धर्मात आणि सहिष्णू संस्कृतीत बसतात? यातली कोणती घटना हिंदू धर्म सहिष्णू, सर्वसमावेशक आणि सनातन असल्याचं द्योतक आहे? दाभोळकर काय मागत होते? नरबळी, अघोरी प्रथा, जादूटोणा अशा आजच्या काळात कुणालाही न पटणार्या कालविसंगत गोष्टीच बंद करू पाहत होते ना? हिंदू धर्मरक्षकांना दाभोलकरांचा इतका राग का येत होता? अघोरी प्रथा हेच हिंदू धर्माचे सनातन वैशिष्ट्य आहे याची पक्की खात्री असल्याशिवाय आणि या अभिमानास्पद वैशिष्ट्यावरच दाभोलकर हातोडा चालवताहेत असा समज करून घेतल्याशिवाय त्यांना दाभोलकरांचा इतका संताप येत नसणार हे उघड आहे! दाभोलकरांची हत्या आणि गांधी-तुकारामांची हत्या यात काडीचाही फरक नाही आणि हत्या करणारीही औलाद तीच आहे! त्याच भेकड मिजाशीनिशी ती आजही शाबूत आहे! मागच्या एकदोन वर्षांपासून ती दाभोलकरांना जीवे मारण्याच्या, हातपाय तोडण्याच्या धमक्या निर्लज्जपणे देत होती! अखेर तिने डाव साधला आणि आपली धर्मसंस्कृती कशी सहिष्णू आहे असं म्हणत ती पुन्हा एकदा भेसूर हसली! आपल्या सहिष्णू संस्कृतीचा विजय असो!
डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. १९६९ साली एम्. बी. बी. एस्. झाल्यानंतर त्यांनी सातार्यात सदाशिव पेठेत प्रॅक्टिस सुरू केली. परंतु रूटिन डॉक्टरी पेशात त्यांचं मन फारसं रमलं नाही. सातार्याचं हे दाभोलकर घराणं उच्चशिक्षित. त्यांचे थोरले भाऊ देवदत्त दाभोलकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि विचारवंत. दुसरे भाऊ दत्तप्रसाद हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि नामांकित लेखकही. समाजवादी विचारांचा वारसा या परिवाराला लाभला. साहजिकच या विचारसरणीच्या मुशीत नरेंद्र यांची जडणघडण झाली. जयप्रकाश, लोहिया, एसेम, इत्यादींचे विचार त्यांच्या मनाला भिडत होते. फुले-शाहू-आगरकर-आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मेंदूत झिरपत होते. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचं वैचारिक नेतृत्व करणारे गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर, ज. रा. दाभोळे, बाबा आढाव आदींचाही प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळे डॉक्टरकी स्वीकारली असली तरी समाजपरिवर्तनाची तगमग त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्यांनी सातार्यात समाजवादी युवक दल ही संघटना सुरू केली. लक्ष्मण माने, पार्थ पोळके, दिनकर झिंब्रे, किशोर बेडकिहाळ, प्रमोद कोपर्डे यासारखे आज नावारूपाला आलेले अनेक नेते, कार्यकर्ते, लेखक, पत्रकार या संघटनेत घडले. पुढे हे काम दाभोलकरांना अपुरं वाटू लागलं. व्यापक पातळीवर व्यापक परिवर्तनाचं काम केलं पाहिजे याचं व्यापक भान त्यांना आलं. त्याच दरम्यान, म्हणजे १९८०-८२ साली, श्रीलंकेच्या बुद्धिस्ट चळवळीतून प्रेरणा घेऊन अब्राहम कोवूर यांनी श्रीलंकेत विज्ञानप्रसारासंदर्भातली एक आगळीवेगळी यात्रा काढली होती. त्यातून प्रेरणा घेऊन भारतात बी. प्रेमानंद यांच्या नेतृत्वाखाली चमत्कार, बुवाबाजी, भूत-भानामती, विज्ञानाधारित प्रयोग वगैरे गोष्टी दाखवणारी अभिनव विज्ञानयात्रा निघाली. ती महाराष्ट्रात आल्यानंतर श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर यांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. अशाप्रकारची चळवळ कायमस्वरूपी आवश्यक आहे हे हेरून श्याम मानव यांनी लगेचच अशी चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे तिचे बॅनर. यथावकाश डॉ. नरेंद्र दाभोलकर तिच्यात सामील झाले. पुढे काही कारणांनी ते त्यातून बाहेर पडले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने काम करू लागले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आज महाराष्ट्रभर २३० शाखा असून या चळवळीत हजारो कार्यकर्ते तन-मन-धनाने काम करत आहेत. भ्र्रम आणि निरास, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, अंधश्रद्धा विनाशाय, अंधश्रद्धा ः प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, तिमिराकडून तेजाकडे अशी १२ पुस्तकं लिहून या चळवळीसाठी आवश्यक असलेली पायाभूत वैचारिक बैठक दाभोलकरांनी तयार केली. त्यांनी चळवळीची टप्पेदार चतुःसूत्री बनवली, ती अशी ः- बुवाबाजी, भूत-भानामती, चमत्कार यांचं पितळ उघड पाडून त्यात चाललेलं शोषण रोखणं-थांबवणं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणं, धर्माची विधायक, कठोर आणि कृतिशील चिकित्सा करणं आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणं. या चारही पातळ्यांवर त्यांनी विवेकाने आणि चिकाटीने वाटचाल केली. धर्मनिरपेक्ष, संवेदनशील, सजग आणि विवेकवादी माणूस तसंच समाज घडवणं हे त्यांनी आपलं जीवितकार्य मानलं होतं. समाजपरिवर्तनासाठी एकाचवेळी प्रबोधन, रचना आणि संघर्ष या तिन्ही आघाड्यांवर लढावं लागतं. अत्यंत धीरोदात्तपणे, ठामपणे आणि तरीही विलक्षण नम्रपणाने दाभोलकर या सर्व गोष्टी करत असत. हे अवघड कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं किंवा असंही म्हणता येईल की, धैर्यधुरंधरता आणि विनम्रता हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेच अविभाज्य भाग होते. ती त्यांची उपजत वृत्तीही असावी. साधेपणा हा तर त्यांच्या दिसण्या-वागण्या-बोलण्याचा महत्त्वाचा पैलू होता. अलीकडच्या काळात साधी राहणी, उच्च विचारसरणी असं ज्यांच्याकडे बोट दाखवून निःशंकपणे म्हणावं असे जे विरळा लोक आहेत त्यात दाभोळकर अग्रभागी होते. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन हे त्यांचं कार्यक्षेत्र नव्हतं. व्यापक परिवर्तन हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी सुरू केले. १९८६ साली त्यांच्या पुढाकारातून सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना झाली. त्यांच्याच प्रेरणेने सातार्यात १९८९ साली परिवर्तन ही व्यसनमुक्ती संस्था स्थापन करण्यात आली. प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार आणि उपचार या चार पातळ्यांवर भरीव स्वरूपाचं कार्य या संस्थेमार्फत चालतं. या संस्थेमार्फत सध्या ४० व्यसनी व्यक्तिंवर एका महिन्याचा निवासी उपचार केला जातो.
साधना हे साने गुरुजींनी स्थापन केलेलं साप्ताहिक. त्या ध्येयवादी, वैचारिक साप्ताहिकाचं गेली १४ वर्षं डॉ. दाभोलकर यांनी कुशल संपादन केलं. नव्या काळाची नवी आव्हानं पेलत ते वाढवलं. या कालावधित या साप्ताहिकाच्या साठ विशेषांकासह सातशे अंक नियमितपणे प्रसिद्ध झाले. साधना प्रकाशन गृहातर्फे गेल्या १० वर्षांत ४० दर्जेदार ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. दाभोलकरांच्या परिसस्पर्शाने साधना साप्ताहिकाने अभूतपूर्व झेप घेतली. त्यांच्या व्यापक दृष्टिकोनामुळेच साधना अधिक बहुजनसन्मुख झालं.
सामाजिक कार्यकर्ता ही दाभोलकरांची ओळख पुरेशी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू, बांगला देशाविरुद्ध झालेल्या कबड्डी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व, व्यक्तिगत कौशल्याची सात सुवर्णपदकं, शिवछत्रपती क्रीडापुरस्कार आणि शिवछत्रपती युवा पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाचे त्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे दाभोलकर हे एकमेव व्यक्ती होत. २००६ साली महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांच्याकडून १० लाखांचा दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा पुरस्कार त्यांना मिळाला. पुरस्कारापोटी प्राप्त झालेली सर्व रक्कम त्यांनी सहजपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देऊन टाकली. कालपरवाच त्यांनी नाशिक आणि लातूर या ठिकाणी जातपंचायतीच्या प्रथेविरोधात मोठ्या परिषदा घेतल्या. जातिअंताच्या दिशेने दिली गेलेली ती जणूकाही नवी ललकारीच होती!
बोलताबोलता एकदा मी सहज त्यांना म्हटलं, डॉक्टर, तुम्ही समाजात विवेकवाद आणि विज्ञाननिष्ठा रुजवण्याची चळवळ आयुष्यभर करत आला आहात, तीच भूमिका आणि तीच चळवळ गौतम बुद्धानेही आयुष्यभर केली. माझं वाक्य संपल्याक्षणी ते उत्स्फूर्तपणे उद्गारले, ‘अरे अरुण, मी विचाराने बुद्धिस्टच आहे. बुद्धाने जी पंचशीलं सांगितली तीच पंचशीलं मी निष्ठेने पाळत आलो आहे. मी खोटं बोलत नाही, मादक पदार्थांचं सेवन करत नाही. व्यभिचार करत नाही, चोरी करत नाही आणि प्राणिमात्राची हत्याही करत नाही. या पाचपैकी एकही गोष्ट मी कधी केली नाही. बुद्धाने सत्य-अहिंसेचा मार्ग सांगितला. हाच विचार महात्मा गांधींनी अनुसरला आणि मीही त्याच वाटेने चाललोय!
जो माणूस कायम विवेकाच्या, अहिंसेच्या, सत्याच्या आणि सत्यशोधनाच्या मार्गाने गेला, त्याचीच आज हत्या झालीय. हा केवळ दाभोलकरांचा खून नाही, तर बुद्ध, गांधी, फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांच्या विचारांचा सार्वजनिक खुनखराबा आहे. असं करू पाहणारे किंवा अशा घटनांमध्ये विकृत आनंद मानणारे अनेक नथुराम अद्यापही महाराष्ट्रात आणि देशात जिवंत आहेत हे या निमित्ताने उघड झालं आहे. देशात सेक्युलॅरिझम आणि रॅशनॅलिझम रुजवू पाहणार्यांच्या कार्यात ही विघातक शक्ती कायम आडकाठी आणत राहणार हे आता सिद्धच झालं आहे. म्हणूनच आता मागे सरून, डरून चालणार नाही. वेगवेगळ्या बुरख्यांखाली लपलेले सगळे नथुराम उघडे पाडले आणि विवेकाधिष्ठित धर्मनिरपेक्ष समाजनिर्मितीची शपथ घेऊन कृतिशील पद्धतीने ती अंमलात आणली आणि त्याची तातडीची सुरुवात म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनासंबंधीचं बिल मंजूर केलं तरच ती खर्या अर्थाने दाभोलकरांना आदरांजली ठरेल.
- अरुण 

आश्वासक पाठिंबा हरपला..Nandu Madhav..Kalamnaama


By  on August 25, 2013
0
feature size
डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखी व्यक्ती जाणं ही मुळात एकतर समाजाचं खूप मोठं नुकसान करणारी घटना आहे. पण खून करणार्याला असं वाटत असतं की आपण अशा व्यक्तिला मारून विजय मिळवलाय. मात्र ते खोटं असतं. कारण ती व्यक्ती मरत असते तिचे विचार मरत नसतात. उलट दाभोलकरांसारख्या व्यक्तिंना मारल्यानंतर त्यांचे विचार अधिक बळकट होत जातात. लोक स्वतःहून त्यांच्या विचारांची जिम्मेदारी घेऊ लागतात. शिवाजी मंदिरासमोर झालेल्या निषेध मोर्च्यातही हीच गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. नाटक, सिनेमा क्षेत्रातील कलावंत, साहित्यिक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी या निषेध मोर्च्यात सहभागी होऊन डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध केला आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विधेयकासाठी झटत होते ते विधेयक आता मंजूर करूनच घ्यायचं हा निर्धार या सर्व क्षेत्रातील लोकांनी केलाय. यामुळेच मला असं वाटतं की, माणूस जाण्याने समाजाचं नुकसान होतं हे खरंय पण त्यांच्या अशाप्रकारे जाण्याने लोक त्यांच्या विचारांचा वसा उचलतात. ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी मानतो. ज्या प्रकाराचा भ्याड हल्ला डॉ. दाभोलकरांवर झालाय. तसे भ्याड हल्ले या देशात सतत सुरूच आहेत. अगदी महात्मा गांधीजींपासून हे भ्याड हल्ले आपण पाहत आलो आहोत. पण आजही असे भ्याड हल्ले करणार्यांना अपयशालाच सामोरं जावं लागतंय आणि इथून पुढच्या काळातही अशा लोकांना अपयशच मिळत राहील याबाबत माझ्या मनात अजिबातच शंका नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विधेयकाचा आग्रह धरत होते. त्या विधेयकाबाबत महाराष्ट्र सरकार कमालीचं उदासिन आहे, याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाहीये. याचं कारण म्हणजे, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात हे विधेयक आणलं जायचं नि त्यावर ठोस कोणताही निर्णय न होता ते सातत्याने लांबवलं गेलं. कुठल्या तरी एखाद्या अधिवेशनात त्या विधेयकाबाबत आशेचा किरण दिसायचा पण तो क्षणातच विझायचा. याचंही कारण उघड आहे. कारण, कोणताही मुद्दा लांबवत नेण्याची आपल्या सत्ताधार्यांची ही जुनीच सवय आहे.पण आता हे चालणार नाही. आम्ही कलावंत, साहित्यिक मंडळी आता विधेयकाविषयीच्या सरकारच्या या टोलवाटोलवीच्या भूमिकेला विरोध करणारच. सर्व कलावंतांनी तसा आग्रहच धरला आहे.
डॉ. दाभोलकरांचं ‘साधना’मधील कामही त्यांच्या एकूण कार्याइतकंच मोलाचं आणि महत्त्वपूर्ण आहे, असं मला वाटतं. साने गुरुजींनी जी गोष्ट रुजवून ठेवली होती ती गोष्ट ‘साधना’ने महाराष्ट्रभर पेरली. हे विचार पेरण्याचं मोठं कामही दाभोलकरांनी तितक्याचे निष्ठेने केलं. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचं ‘साधना’ हे एकमेव मुखपत्र आहे. ज्याच्याशी महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारांची माणसं जोडली गेली आहेत. डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या सार्या सहकार्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणांची एक मोठी फळी उभारली होती. या कामातही साधनाचा मोठा सहभाग आहे. आमच्यासारख्या कलावंतांची, समाजप्रबोधनाचं कार्य करणार्या प्रत्येकाची ‘साधना’ने कायमच मोठ्या आस्थेने दखल घेतलेली आहे. असं काम करणार्यांना ‘साधना’च्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहनच मिळालेलं आहे. ‘साधना’च्या माध्यमातून हे सारं काम करण्यातही डॉ. दाभोलकरांनी मोलाचं योगदान दिलंय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आणि माझा नेहमीच संबंध येत नसे. पण जेव्हा कधी आम्ही भेटायचो तेव्हा माझ्यासाठी तो एक अनुभव असायचा. कारण ते आपण करत असलेल्या कामाची नेहमी माहिती ठेवत असत. आणि आपण त्यांना भेटलो की त्या कामासंदर्भात चर्चा करत असत. पाठिंबा देत असत. मग मी केलेलं नाटक असो किंवा सिनेमा ते आवर्जून पाहायचे आणि प्रतिक्रिया द्यायचे. महाराष्ट्रात अशाप्रकारे पाठिंबा देणारे जे चार चेहरे आठवता येतील त्यातील एक चेहरा दाभोलकरांचा आहे. आज तोच चेहरा हरपलाय. अगदी दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी त्यांना आमच्या ‘सांगड’च्या कार्यक्रमासाठी मेसेज केला होता. त्यात मी त्यांच्या ‘सांगड’साठी काही तारखा मागितल्या होत्या. पण दाभोलकरांच्या त्या तारखा आधीच गेल्या होत्या. त्यांनी मला तसं मेसेज करून सांगितलंही. पण त्याचवेळेस त्यांनी जे काही सांगितलं ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ‘तू मागत असलेल्या माझ्या तारखा आधीच गेल्या आहेत. त्या तारखा कशा नि कुठे कुठे गेल्या आहेत त्याविषयीची माहिती मी तुला दिलेली आहे. मात्र असं असलं तरीही आपले कार्यकर्ते तिकडे आहेत. ते तुला सर्व प्रकारची मदत करतील. तू त्यांच्याशी संपर्क साध. तू ‘सांगड’च्या माध्यमातून करत असलेलं काम अतिशय महत्त्वाचं आहे.’
डॉ. दाभोलकर कायमच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारे पाठिंबा देत असत. आता इथून पुढचा संपूर्ण प्रवास डॉक्टरांनी दिलेल्या विचारांची कास धरून करावा लागणार आहे. त्यामुळे नुसते कलावंत, साहित्यिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं हे नुकसान आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचे हे विचार कायम जिवंत ठेवत ठेवू याविषयी माझ्या मनात काहीच शंका नाहीये.

विवेकी कार्यकर्ता...Pushpa Bhave, Kalamnaama

.Pushpa Bhave,

By  on August 25, 2013
0
feature size
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे समाजवादी युवक चळवळीतून आलेले कार्यकर्ते. डॉ. दाभोलकर हे एकाचवेळी समाजवादी चळवळीशी संलग्न असले तरी स्वतःच्या नव्या नव्या वाटा, चळवळीच्या नवीन नवीन दिशा शोधत राहिले. त्यातलं एक सूत्र नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलनाचं होतं. देवदासी जटा निर्मूलन परिषद निपाणीला घेऊन त्यांनी एका जटिल प्रश्नाला हात घातला आणि हळूहळू अंधश्रद्धांचा कावेबाज बाजार करणार्या अनेक बाबा-बुवा-बाया यांचा दंभस्फोट केला. दाभोलकरांमध्ये उपजतच संघटना कौशल्य असल्याने तरुण मुलंमुली हा या चळवळीचा नवा चेहरा होता. अंधश्रद्धाविरोधी चळवळीची बांधणी करत असताना महाविद्यालयं, विद्यापीठं प्रसंगी कुलगुरूही त्यांनी या चळवळीच्या प्रवाहात आणले.
ही चळवळ विवेकाची असल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करणारं लेखन दाभोलकरांनी सातत्याने केलं. या लिखाणाला डॉ. दाभोलकरांच्या विवेकी व्यक्तिमत्त्वामुळे तार्किक युक्तिवादाचं परिणामकारक स्वरूप आलं. चळवळीच्या विविध दिशांनी लोकांकडे जाण्याच्या प्रयत्नांविषयी ते जागृत असत. त्यामुळे परिषदा, प्रात्याक्षिकं – ज्याला ते ‘भांडाफोड’ म्हणत, कधी समाजातील नामवंत, विचारवंत, कलाकार यांना सहभागी करून घेत, कधी आंतरजातीय विवाहासारखे उपक्रम सातत्याने सुरू ठेवत. दुसर्या बाजूला त्यांनी प्रस्थापित व्यवस्थांकडे कधी पाठ फिरवली नाही. त्यामुळे कुलगुरूंशी बोलून विवेक वाहिनीसारख्या महाविद्यालयीन उपक्रमांना कुलगुरूंची मान्यता आणणं अथवा शासनाशी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक यावं म्हणून विचारविनिमय करणं हे त्यांनी अथकपणे केलं. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या रूपाने महाराष्ट्रातील वाचकांशी सतत संवाद साधला.
हे सारं कार्य करतानाच दुसर्या बाजूला डॉ. श्रीराम लागू, डॉ. बाबा आढाव यांच्यासारख्या समविचारी सहृदयांबरोबर सामाजिक कृतज्ञता निधी हा प्रकल्प उभारून गेली २५ वर्षं तो यशस्वीपणे चालवला. लग्नाची बेडी या नाटकाचे नामवंत कलाकारांनी केलेले २५ प्रयोग, त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत महाराष्ट्रभर निधी संकलनाची केलेली मोहीम म्हणजे त्यांच्या नेटक्या कार्यप्रणालीचंच उदाहरण होय.
समाजवादी चळवळ, सेवा दल यांचा अनेक वर्षं संपर्क होताच पण ‘साधना’ साप्ताहिकाची धुरा प्रा. वसंत बापटांनंतर त्यांनी खांद्यावर घेतली. त्यांच्या कारकिर्दितील ‘साधना’त राबवलेल्या वेगवेगळ्या संकल्पना, तिचं विस्तारित गेलेलं वर्तुळ, तरुण संपादकांवर जबाबदारी टाकून साधनेला ताजेपणा देण्याचा प्रयत्न आणि या सार्याला डॉक्टरांच्या लोकसंपर्कामुळे आर्थिक बळ ही लाभलं.
डॉक्टरांचा दिवस किती तासांचा असतो? अशी विचारणा अनेकदा होत असते. पण दिवस, महिन्यातला वेळ अत्यंत काटेकोरपणे वापरणं ही त्यांची खासियत. विवेकी स्वभावाच्या माणसाला आपल्या हातातला वेळ विवेकानेच वापरता आला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. सामाजिक कृतज्ञता निधीचं कार्य करताना निधीप्राप्त कार्यकर्त्यांना वेगवेगळं प्रशिक्षण कसं मिळेल आणि त्यांचं दैनंदिन जीवन स्वस्थ कसं राहिल याची ते सतत काळजी घेत. नुकत्याच जुलैमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीत सर्व कार्यकर्त्यांचा विमा उतरवण्याचा उपक्रमही ‘साकृनि’मध्ये सुरू केला होता. डॉ. दाभोलकरांवर आजवर वेगळ्या प्रकारचे अनेक छोटे मोठे हल्ले झाले. त्यांच्याविषयी असत्य प्रचार करण्यात आला. पण त्यांची मनःशांती कधी ढळत नसे. कोणत्याही पातळीवरच्या विरोधकांशी विचारविनिमय करायला त्यांची तयारी असे आणि तसा अवधीही ते देत असत. आपल्या महाविद्यालयीन जीवनात खिलाडी असणार्या दाभोलकरांनी आपल्याला होणारा विरोधही तसाच खिलाडीपणे घेतला. अशा विवेकी सामाजिक कार्यकर्त्याला, त्याला संपवण्यासाठी पुरोगामी म्हटल्या जाणार्या महाराष्ट्रात हल्ला व्हावा ही घटनाच लांच्छनास्पद आहे. धर्मांध, जात्यांध शक्तिंची अरेरावी महाराष्ट्रात वाढत चालल्याचं हे लक्षण आहे. गोळ्या घालून विचार थांबवता येत नाही, हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर गेले तरीही विवेकाची, सामाजिक न्यायाची चळवळ सुरूच राहील.
निर्ममवृत्तीने काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्याला आमची आदरांजली!
- प्रा. पुष्पा भा